Bollywood Actors Phobia: बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांना आहे या गोष्टीचा फोबिया ! जाणून घ्या इथे

Published on:

Follow Us

आपल्या सर्वांनाच कशा ना कशाची तरी भीती वाटतेच. पण काही लोकांची भीती इतकी वाढते की ती भिती फोबियामध्ये बदलते. बॉलिवूड कलाकारांसोबतही असेच काहीसे घडते. चला तर मग जाणून घेऊयात, बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री कशाला घाबरतात.

अलिकडेच अभिनेत्री तृप्ती डिमरीने तिच्या इंस्टाग्रामच्या स्टोरी सेक्शनमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यावर तिने लिहिले की ती तिच्या भीतीचा सामना करणार आहे. अभिनेत्रीने तिच्या भीतीबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. हे फोटो समुद्रकिनाऱ्याचे होते. हे फोटो पाहून असे वाटते की कदाचित तृप्तीला समुद्रात जाण्याची भीती वाटत असेल. अशा परिस्थितीत तिला ही भीती दूर करायची आहे. असे अनेक कलाकार आहेत ज्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटते. काही बॉलिवूड नायक आणि नायिकांच्या अशा भीती आणि फोबियांबद्दल जाणून घेऊयात.

आलिया भट्टला वाटते याची भीती :
Bollywood Actors Phobia

आलिया भट्टला अंधाराची भीती वाटते. तिला अंधारात भीती वाटते. रात्री झोपताना ती मंद दिवा चालू ठेवते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलियाला तिच्या बहिणीने लहानपणी एका खोलीत बंद केले होते, ज्यामुळे तिला अंधाराची भीती वाटू लागली.

शाहरुख खानला वाटते याची भीती :

Bollywood Actors Phobia

शाहरुख खानने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे, की त्याला घोडेस्वारीची भीती वाटते. ‘करण-अर्जुन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तो घोड्यावरून पडला, ज्यामुळे तो जखमी झाला होता. त्याचप्रमाणे, ‘अशोका’ चित्रपटादरम्यान, शाहरुख खानला घोडेस्वारी करतानाही खूप समस्या आल्या होत्या. या कारणास्तव, तो चित्रपटांमध्ये घोड्याचे दृश्ये स्वतः करत नाही, यासाठी शाहरुख खानचा डबल वापरला जातो.

अधिक वाचा:  AR Rahman News: ए आर रहमान यांची प्रकृती बिघडली रुग्णालयात केले दाखल
दीपिका पदुकोणला वाटते याची भीती :

Bollywood Actors Phobia

दीपिका पदुकोणला निसर्ग खूप आवडतो, तिला निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते. पण तिला सापांची खूप भीती वाटते. त्यामुळे, ती बऱ्याचदा अशा चित्रपटांमध्ये असे दृश्ये करत नाही ज्यात साप दाखवले जातात.

आमिर खानला वाटते याची भीती :

आमिर खान हा बॉलिवूडचा एक उत्तम अभिनेता आहे. एकदा त्याला मृत्यूची भीती वाटली की, तो घाबरू लागला, हा एक प्रकारचा फोबिया आहे. यामुळे त्याने ‘दंगल’ चित्रपटाच्या शूटिंगमधून पाच महिन्यांचा ब्रेक घेतला. आमिर खानने दिग्दर्शक नितेश तिवारी यांना असेही सांगितले होते, की जर त्यांना काही झाले तर त्यांनी चित्रपटासाठी एका नवीन अभिनेत्याला घ्यावे. यासाठी आमिरने दिग्दर्शकाला काही नावेही सुचवली होती.